तुमचा हिस्सा तर फाळणीवेळीच दिला आहे; असुदुद्दीन ओवेसींना भाजपचे प्रत्युत्तर

0
596

मुंबई, दि. २ (पीसीबी) – असुदुद्दीन ओवेसी यांनी सांभाळून बोलायला पाहिजे. त्यांना कधीही कोणीही भाडेकरू म्हटले नाही. मात्र, ते हिस्सेदारीची भाषा करत असतील तर मी एवढेच सांगू इच्छितो की, तुमचा हिस्सा तर १९४७ मध्येच देऊन टाकला. त्यामुळे आता हे प्रकरण संपले आहे, असे भाजप नेते माधव भंडारी यांनी म्हटले आहे.

भारतामध्ये मुस्लीम म्हणजे भाडेकरू म्हणून राहत नाहीत. त्यांचा या देशात बरोबरीचा हिस्सा आहे, असे विधान एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. यावर माधव भांडारी यांनी चोख प्रत्यु्त्तर दिले आहे.

असुदुद्दीन ओवैसी यांनी दिल्लीतील एका सभेत आम्ही कोणाचीही मनमानी सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. भारताच्या राज्यघटनेने आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याची मुभा दिली आहे. जर देशाचे पंतप्रधान मंदिरात जाऊ शकतात, तर आम्हीदेखील मशिदीत जाण्याचा हक्क आहे. आम्हाला हिंदुस्थानाला समृद्ध ठेवायचे आहे आणि आम्ही ते जरूर करु. मात्र, या देशात आमचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही भाडेकरू नाही, असेही ओवैसी यांनी म्हटले होते.