…तर राहुल गांधींना लोक बुटांनी मारतील; काश्मीरचे राज्यपाल घसरले

0
392

श्रीनगर, दि. २९ (पीसीबी) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० चे समर्थन केले, तर लोक त्यांना बुटांनी मारतील,  अशी टीका जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आहे.

सत्यपाल मलिक म्हणाले की,  राहुल गांधी देशातील प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत, परंतु ते राजकीय नवशिक्याप्रमाणे वागले आहेत.  पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे.

राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे विधान  करायला नको होते. ज्यावेळी देशात निवडणूक होईल, त्यावेळी त्यांच्याविरोधात काही बोलण्याची गरज नाही.   त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर पक्षाची  भूमिका जाहीर करावी. त्यांनी आतापर्यंत काश्मीरबाबात भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे मलिक म्हणाले.