अहमदनगर, दि. ३१ (पीसीबी) – काँग्रेसकडून आघाडीचा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव अद्यापर्यंत आलेला नाही. काँग्रेस आम्हाला १२ जागा देणार नसेल, तर आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते व भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (गुरूवार) येथे काँग्रेला दिला.
शिर्डीत पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीची राज्यातील ४८ जागांवर लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाऊ, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
चार किंवा सहा जागा अशी आमची मागणी आहे, अशी चर्चा केवळ प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असल्याचे सांगून जागांविषयी अद्याप कोणतीही चर्चाच झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या ज्या जागांवर काँग्रेसचा तीनवेळा पराभव झाला आहे, त्या जागा आम्ही मागितल्या आहेत, असे आंबेडकरांनी सांगितले.