जितेंद्र आव्हाडांना काँग्रेसची चिंता; राहुल गांधींना केली “ही’ विनंती  

0
421

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  देशाला आपली गरज आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केली आहे.

याबाबत आव्हा़ड यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  गेल्या ३५ वर्षापासून मी सार्वजनिक जीवनात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. लोकशाही मुल्यांवर आणि भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर माझा विश्वास आहे. आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मला मनापासून खूप दु:ख झाले.

काँग्रेसमध्ये जे काही चालले आहे ते मी पाहत आहे. आपण हे एक संवेदनशील नेते आहात. आज काँग्रेसला चांगले दिवस नसले, तरी भविष्यात पक्षाला सुवर्णसंधी प्राप्त होऊ शकते. तेंव्हा आपण आणि इतरांमधील फरक लोकांच्या लक्षात येईल. कृपया करून आपण पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे असे मला वाटते.