‘जिंकलो नसलो, तरी हरलो नाही’- शरद पवार

0
674

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत अपेक्षित जागा न मिळाल्याने भ्रमनिराश झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो, तरी हरलो नाही’, अशा शब्दांत  कार्यकर्त्यांना  न खचण्याचे आवाहन केले आहे. तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपच्या कांचन कुल यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या  निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. तर पार्थ पवार यांच्या मावळमधील पराभवामुळे पवार कुटुंबाने पहिल्यांदाच हार पाहिली आहे. त्यामुळेच थकलो आहे जरी, तरी अजून झुकलो नाही आणि  जिंकलो नसलो तरी अजून ही हरलो नाही, अशा आशयाची पोस्ट पवारांनी टाकली आहे.

दरम्यान, बारामती  जिंकण्याचा भाजपने चंग बांधला होता. मात्र, शरद पवारांनी  बारामतीचा  बालेकिल्ला ताब्यात ठेवत भाजपचे मनसुभे उधळून लावले होते. सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा बारामतीतून निवडून आल्या आहेत.  पवार कुटुंबातील कोणतीच व्यक्ती पुन्हा संसदेत जाणार नाही, असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता.