..जर थोपटेंना काँग्रेसचे विचार पटत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा – गिरीश बापट

0
402

पुणे, दि.१ (पीसीबी) – उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनात घुसून तोडफोड केली. हातात काठ्या, दगड घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या "केबिन’वर चाल करीत दगडफेक केली.  यासर्व  घडलेल्या प्रकरणावर खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार संग्राम थोपटे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांना एखाद्या खात्याची जबाबदारी द्यायला हवी होती. पण, त्यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले. जर थोपटेंना काँग्रेसचे विचार पटत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवावी त्यांना आम्ही निवडूण आणू, असेही खासदार गिरीश बापट म्हणाले.

त्यात काँग्रेस भवनाचे नुकसान झाले असून, हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थोपटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी पक्षाकडे केली आहे.