छगन भुजबळांना दिलेल्या वागणुकीचा नाशिककरांनी बदला घ्यावा – जितेंद्र आव्हाड

0
521

नाशिक, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी –काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दिलेल्या वागणुकीचा बदला येत्या निवडणुकीमध्ये नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व  आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (बुधवार) येथे  केले.  

राष्ट्रवादी  पक्षाच्या वतीने राज्यात निर्धार परिवर्तनाचा ही यात्रा काढली आहे. त्यानिमित्त नाशिक येथे आयोजित केलेल्या सभेत आव्हाड यांनी आपल्या भाषणात  शिवसेना- भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राफेल ते नथुराम गोडसे आणि भगवा ते भाजपच्या धोरणांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला.

नाशिक शहराच्या समस्या, बंद  करण्यात आलेले कारखाने,  स्थानिक तरुणांची बेरोजगारी यावर त्यांनी भाजपवर  घणाघात केला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, माजी खासदार समीर भुजबळ, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजी आव्हाड  आदी उपस्थित होते.