“कोरोना रुग्णांच्या वाढीला ब्रेक, १५ तासात एकही नवा रुग्ण नाही”

0
709

मुंबई,दि.१७(पीसीबी) – कोरोना रुग्णांच्या वाढीला मागील १५ तासात ब्रेक लागला आहे. मागील १५ तासात राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

टोपे म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज कोणतीही वाढ नाही. सर्व ३९ रुग्णांची तब्येत स्थिर आहे. आज कॅबिनेट बैठकही आहे. त्यातही कोरोनाच्या संबंधात चर्चा होईल. आपण अनेक खबरादारीचे उपाय केले असल्याचं म्हटलं आहे

दरम्यान, ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा करण्यात आलेल्या उपाययोजनांचा गाभा आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात न येता अधिकाधिक अंतर कसं ठेवता येईल यावर सर्वांनी लक्ष द्यावं, असं आवाहनही राजेश टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.