‘कोरोनात सरकारकडून योग्य काम होत नाही’

0
365

मुंबई, दि.१९ (पीसीबी): देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही , असे स्पष्ट मत विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवन्द्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भाजपच्या शिष्टमंडळासह त्यानी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतल्यानंतर ते राजभवनाबाहेर माध्यमाशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, कोरोना साथीत अनेकांना उपचार मिळत नाहीत. एकीकडे ही अवस्था दुसरीकडे शेतमाल पडून आहे, त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही. बियाणं मिळत नाहीत. खतं मिळत नाही. शेतकऱ्यावर संकट आलं आहे.

बारा बलुतेदारांवरही संकट आहे. केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलं नाही, ते द्यायला हवं, असे मत फडणवीस यानी व्यक्त केले.
शरद पवार पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं, अशी खोचक टिपण्णी करुन, या राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरु आहे असा आरोप फडणवीस यानी केला.

राज्यातून आपल्या गावला जाणार्याना र्केद्राने ८५ टक्के तिकिटाचे पैसे दिले. राज्याने १५ टक्के द्यायचे होते, मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेच्या खर्च किती येतो हेच माहित नाही, त्यामुळे महाराष्ट्र बचाव ही भाजपची भूमिका घेऊन निवेदन दिले आहे, असे ते म्हणाले.

केंद्राने एवढं मोठं पॅकेज दिलं, तरीही यांचं केंद्राकडे बोट, ते राजकारण नाही आणि आम्ही सूचना मांडल्या की आमचं राजकारण कसं ? सामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत, केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही, त्यांनाही देण्याच्या सूचना आहेत, पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच मिळत नाही, रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही ,असे आपले निरिक्षण असल्याचे देवेंद्र फडणवीस यानी सांगितले.

रुग्णांना ॲम्बुलन्स मिळत नाही, त्याअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. एक डॅशबोर्ड बनवून, रुग्णालयातील जागा सांगू शकतो, त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबेल. आता हे उघड्या डोळ्याने पाहणे शक्य नाही.
आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहे, आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्यात.

राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करु, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही पाठिशी उभं राहू, मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली, आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहे, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको असेही म्हणाले.
पायी जाणाऱ्या मजुरांना थांबवा या सूचना केल्या होत्या, मात्र जातात तर जाऊया आपलं संकट टळतंय अशी धारणा होती, मात्र या मजुरांना ट्रेन किंवा बसने पाठवलं जाऊ शकलं असतं, असेही फडणवीस यानी सांगितले.

परदेशात अडकलेल्यांना भारतात परतायचं आहे, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे विमानं उतरण्यास परवानगी नाही, लोक व्हिडीओ करुन पाठवत आहेत, त्यांचे हाल होत आहेत, असे फडणवीस यानी सांगितले.

विमाने उतरण्यास महाराष्ट्राने परवानगी द्यावी, त्यांना क्वारंटाईन करुन उपचार करता येतील, मात्र त्यासाठी निर्णयाची गरज आहे, निर्णय होत नाहीत – देवेंद्र फडणवीस

सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, राज्य सरकारने पॅकेज दिलं पाहिजे, बारा बलुतेदारांचा विचार सरकारने करायलाच हवा, अन्य राज्याने केला मग आमचं सरकार कधी करणार हा प्रश्न आहे- देवेंद्र फडणवीस

आम्ही राज्य सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. परंतु सरकारने दोन महिन्यांनी विरोधी पक्षांसोबत बैठक घेतली : देवेंद्र फडणवीस