मुंबई, दि, २ (पीसीबी) – विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर येऊन ठेपली असताना, सर्वच पक्ष कामाला लागली आहेत. खासदार नारायण राणें यांच्या पक्षाने देखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
कुडाळ-मालवण मतदासंघा मधून नारायण राणे यांनी निवडणु न लढविल्यास जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत हे स्थानिक असल्याने त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी, असा ठराव महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीत स्वाभिमान पक्षाच्या संघटना बांधणीविषयी चर्चा झाली. या चर्चेत लवकरच जिल्हा परिषद मतदार संघनिहाय पक्षाच्या बैठका घेण्याचे ठरले. त्यानंतर झालेल्या चर्चेत कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमान पक्षाचा उमेदवार कोण असावा? याविषयीची चर्चा रंगली यानंतर एकमुखाने जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या उमेदवारीबाबत माजी मुख्यमंत्री राणे हेच अंतिम निर्णय घेणार असले तरीही या मागणीचा विचार करावा, असे मत पदाधिकाऱ्यांनी मांडले.