यवतमाळ, दि.८ (पीसीबी) – ‘ एखाद्या कायद्याला लोकांचा विरोध असेल, तर तो कायदा सरकारने लोकांवर लादू नये, असे म्हणत सीएए आणि एनआरसी कायद्यासंदर्भात उल्लेख टाळत कायदा रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारकडे केली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
या कायद्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. तसेच महीला असुरक्षित असणे ही बाब कोणत्याही सरकारसाठी भूषणावह नाही. राज्यात महिलांची सुरक्षा सर्वतोपरी असली पाहिजे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेचा निषेध करीत महिलांसाठी सरकार कडक कायदे करणार असल्याचे संकेत पटोले यांनी दिले.