नवी दिल्ली,दि.८(पीसीबी) – भाजप नेते मनोज तिवारी यांनी माझं अंतर्मन सांगतंय की दिल्ली भाजपच जिंकणार, असा दावा केला आहे. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
संपूर्ण देशाचं लक्ष सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत लागलेलं असताना, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, गोपाल राय, भाजपचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, अलका लंबा हे महत्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणूक आपसाठी अटीतटीची, भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कसोटी पाहणारी तर काँग्रेससाठी अस्तिात्वाची लढाई आहे.