आपण मोदी यांना पंतप्रधान मानत नाही – ममता बॅनर्जी

0
527

कोलकाता, दि. ७ (पीसीबी) – चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  हजर नव्हत्या, असा आरोप पंतप्रधान  मोदी यांनी केला होता.  या आरोपाला  उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी आपण  मोदी यांना पंतप्रधान मानत नाही, असे म्हटले आहे. त्यामुळेच  या बैठकीला उपस्थित राहिले नाही, असे ममता यांनी  स्पष्ट केले.

मला मोदी यांच्यासोबत कोणत्याही  व्यासपीठावर बसायचे नाही.  मी आता  थेट देशाच्या नवीन पंतप्रधानांशीच बोलणार आहे . आम्ही चक्रीवादळासाठी आवश्यक ती पूर्वतयारी   करू शकतो. निवडणुकीच्या तोंडावर त्यासाठी आम्हाला केंद्र सरकारच्या मदतीची गरज नाही, असे ममता यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी चक्रीवादळाचे  राजकारण करत  आहेत, असा आरोप   मोदी यांनी  केला होता. केंद्र सरकार बचावकार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील राजकारणामुळे त्यामध्ये अडथळे येत आहेत. मी स्वत: ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या इतक्या उद्दाम आहेत की, त्यांनी माझा फोन घेण्यास नकार दिला, असे मोदींनी सांगितले.