मुंबई, दि. १ (पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अहमदनगर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून ३०० कोटी रुपये देऊ, अशी घोषणा केली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार शिवसेनेने निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. यामुळे दानवे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.