अमृता फडणवीसांचे ट्विट…सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर…

0
202

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई परिसरातील वीजप्रवाह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे खंडित झाला. यानंतर सरकारसह सर्व मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली. मुंबई परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर टीका केली. “सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही,’ तर लोकच सत्तेला भ्रष्ट करतात, अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला.

मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह काल अचानकपणे खंडित झाला. लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या आहेत. याशिवाय, मुंबई परिसरात असणाऱ्या कॉर्पोरेट कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले.

दरम्यान मुंबईतील वीजपुरवठा जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळाने पूर्ववत सुरु झाला. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा काही कालावधीनंतर हळूहळू सुरु झाला. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ठप्प झालेली लोकल रेल्वेची वाहतूकही पूर्वपदावर आली.