…काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसे मेल्यावर? ; अजित पवार मुख्यमंत्र्यांवर भडकले

0
423

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – कोल्हापूर, सांगलीतील परिस्थीती अत्यंत भीषण आहे. शहराचा बहुतांश भाग पुराने व्यापलेला आहे. सलग चार दिवसात होत असलेली अतिवृष्टी व त्यामुळे होऊ शकणारे परिणाम याबाबत गांभीर्याने सरकारने विचार केलेला नाही’. अशा परिस्थितीत राज्य शासन मदतीसाठी कमी पडतेय. यावरच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच भडकले आहेत.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, कर्नाटकच्या येडियुरप्पांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचे आमदार मुंबईत ठेवता येतात. पण त्यांचे सरकार आल्यावर यांना पान्हा फुटत नाही. म्हणतात आम्ही धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी येडियुरप्पांना सांगतो. आरे काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसे मेल्यावर? अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यावर टिका केली आहे.