“…म्हणून भाजपा सरकार पाडण्याचं गाजर दाखवतंय”

0
324

कराड,दि.२५(पीसीबी) – कार्यकर्ते, आमदरांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून भाजपा सरकार पाडण्याचं गाजर दाखवतंय, असं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. कराड येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधीपक्षांना सरकार पडणार अस म्हणावंचं लागतं. कार्यकर्ते बरोबर रहावेत, आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये यासाठी त्यांना सारखं गाजर दाखवायंच काम करावं लागतं. पण जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी हे तिघं या आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, तोपर्यत या सरकारला काहीही होणार नाही. त्यांचे १०५ लोक निवडून आलेले असतानाही सरकार स्थापण्याची संधी मिळाली नाही हे त्यांचं खरं दुखण आहे. त्यामुळे सारखं ते काही ना काही काड्या पेटवायचं काम करत आहेत, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी अजित पवार यांनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत भाष्य करणे टाळलं. शरद पवार यांनी जयसिंगराव गायकवाड यांच्या पक्ष प्रवेशावेळी स्पष्टपणे याबाबत पक्षाची भूमिका मांडली.