मुंबई, दि. २६ (पीसीबी) – चमचेगिरीतून स्थान मिळवलेल्या आणि ज्यांची स्वतःची नोकरी धृतराष्ट्राच्या आंधळेपणावर अवलंबून आहे, त्यांनी कर्तृत्ववान माणसांच्या खुर्चीची काळजी करू नये. महाभारतातील संजयचा रोल फक्त विनोदी भूमिका करण्याचा आहे, टीम सिलेक्टरचा नाही, अशा शब्दात महाराष्ट्र भाजपच्या आयटी सेलने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री बदलाच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.