जालना जिल्ह्यात वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू

1 Min Read

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या महाकाळा गावा जवळ वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी विजेच्या गडगडाटासह अंबड तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान महाकाळा गावांजवळील नाथनगर शिवारात शेतात लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या या तरुणावरती वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोविंद लहाने (वय वर्ष 21)आणि आदित्य बेद्रे (वय वर्ष 20) अशी या मयत तरुणांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे महाकाळा गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे तरुण पाऊस सुरू असताना महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती येथे लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. मात्र लिंबाच्या झाडावर वीज कोसळल्याने या दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Share This Article