विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या

0
59

मुंबई, दि. ४ : धनगर आणि धनगर एकच असल्याचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, यासाठी आदिवासी आमदारांकडून विरोधक केला जात आहे. तसेच गेल्या 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांकडून पेसाभरती अंतर्गत भरतीच्या आंदोलक करत आहेत. मात्र यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याचे आज आदिवासी आमदारांनी आक्रमक पाऊल उचलले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट मंत्रालयातील संरक्षक जाळीवरच उड्या मारल्या. तर काही कागदपत्र त्यांनी फेकून दिले आहेत. मागील 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्याअंतर्गत भरती करा, या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहा दिवसांपासून आम्ही वेळ मागत आहोत मात्र ते देखील आम्हाला भेट देत नाहीत. जर असे होत नसेल तर आम्हाला वेगळा पर्याय निवडावा लागेल, असा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी यांनी दिलाय होता.

आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील जाळीवर उड्या
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यात याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही तुमच्या विषयाबाबत सकारात्मक आहोत, असे आश्वासन झिरवाळ यांना दिले. मात्र कुठलाही निर्णय न झाल्याने आदिवासी आमदारांनी आक्रमक पवित्रा उचलला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामन खोसकर यांच्यासह यांचे सहकाऱ्यांनी थेट मंत्रालयातील जाळीवरच उड्या मारल्या. यानंतर पोलिसांनी त्यांना सुखरूप जाळीबाहेर काढले. त्यानंतर आदिवासी आमदार मंत्रालयात ठिय्या मांडून बसले आहेत.

झिरवाळ साहेबांनी कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये : गोपीचंद पडळकर
याबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, आज इतक्या मोठ्या पदावर आहेत. सरकारचे जबाबदार प्रतिनिधी आहेत. त्यांनी असे पाऊल उचलण्याची आवश्यकता नाही. जो काही विषय होईल तो मुख्यमंत्री साहेबांच्या चर्चेतून सोडवला जाईल. इतकी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. सरकार आता बऱ्याच घटकांना न्याय देण्याच्या संदर्भात प्रयत्न करत आहेत. पेसासंदर्भात देखील सरकार चांगली भूमिका घेईल. त्यामुळे झिरवाळ साहेबांनी कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये, असे प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.