गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर अण्णांचे उपोषण मागे

0
403

अहमदनगर, दि. २ (पीसीबी) – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आजपासून (मंगळवार) सुरू करण्यात येणारे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विविध मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यामुळे उपोषण स्थगित करत आहोत, अशी घोषणा अण्णा हजारे यांनी केली.