नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी अर्थात विकास दर ८.२ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीतली ही आकडेवारी समोर आली आहे. एकीकडे नोटाबंदी, राफेल करार यावरून मोदी सरकारवर विरोधक तुटून पडलेले असताना ही बातमी समोर आली आहे. २०१७ मध्ये जीडीपी ७.७ टक्क्यांवर आला होता. नोटाबंदीमुळे विकासदर घसरला आणि अर्थव्यवस्था कोलमडली अशी टीका होत असतानाच विकास दर ८.२ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.