ही थाळी कितीची ??? निलेश राणेंच ट्विट

0
641

मुंबई.दि.२५(पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० रुपयात थाळी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १० रुपयांत शिवभोजन उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यसरकारच्या या निर्णयानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्यासमोर जेवण वाढलेलं दिसत आहे. तो फोटो ट्विट करून ही थाळी किती रूपयांची आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे दिसत आहेत.

दरम्यान, 10 रुपयांमध्ये मिळणाऱ्या थाळीत दोन पोळ्या, भाजी, वरण आणि भात यांचा समावेश असणार आहे. सर्वसामान्यांसाठी ही थाळी राज्यात लवकरच सुरु करण्यात येणार आहे.