सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करावा लागला – मुख्यमंत्री

0
548

अहमदनगर, दि. १२ (पीसीबी) – अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी चांगले काम केले आहे. तुम्हाला कधीही  विसरणार नाही. मात्र, कधी कधी सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो. सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करावा लागला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (शुक्रवार) येथे म्हणाले. 

अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत  मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी  त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससह पक्षाध्यक्ष  शरद पवार यांच्यावर  तोफ डागली.

दरम्यान, या सभेत भाषण करताना रोखल्याने भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना राग अनावर झाला. यावेळी त्यांनी आयोजकांवर नाराजी व्यक्त करत भाषण सुरुच ठेवले. यावेळी मागील ५ वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडताना दिलीप गांधी  यांना भरून आले. शेवटी भाषणात दिलीप गांधींनी सुजय विखेंचे नाव न घेता मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहनही केले.