मुंबई, दि. २८ (पीसीबी) – सिंचन घोटाळ्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जबाबदार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. या प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची पाठराखण करताना एसीबीने सादर केलेल्या शपथपत्राचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याचे म्हटले आहे.