शेतकऱ्यांना त्यांनी पिंजून पिंजून काढले – बाळासाहेब थोरात

0
301
श्रीरामपूर, दि.८ (पीसीबी) – श्रीरामपूरयेथील आझाद मैदानावर दिवंगत नेते जयंत ससाणे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. 
थोरात म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. आम्ही दिल्ली काँग्रेसकडून सहमती घेण्यासाठी मन वळविले, असे ते म्हणाले.
‘दिवंगत इंदिरा गांधी यांना आणिबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली. काँग्रेसच्या ए.आर.अंतुले यांना मुख्यमंत्री करण्यातही ठाकरे यांनी सहकार्य केले. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या मैत्रीचे नाते जुनेच असल्याचे थोरात यांनी सांगितले.
मागील सरकारने ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. मात्र केवळ भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरले. बायकामुलांना रात्री अर्ज भरण्यासाठी रांगेत उभे केले. शेतकऱ्यांना त्यांनी पिंजून पिंजून काढले,’ असे म्हणत थोरातांनी भाजपवर निशाणा साधला.