मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी धुळे दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना स्थानबध्द करण्यात आले होते. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दौऱ्यात अडथळा नको म्हणून शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटीश मनोवृत्तीचे आहे, असे टीकास्त्र धनंजय मुंडे यांनी सोडले आहे.