शिरूर लोकसभा मतदारसंघात विलास लांडेंना उमेदवारी म्हणजे बळीचा बकरा; गिरीश बापटांची टिका

0
1060

चाकण, दि. २ (पीसीबी) – २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील विलास लांडे हे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. आता अचानक लांडे हे फ्लेक्सवर विविध प्रश्न विचारू लागले आहेत. हा विलास इतकी वर्षे कुठे होता? त्याला अचानक इतके प्रश्न कसे काय पडू लागले? असा सवाल पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला आहे. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून विलास लांडे यांना उमेदवारी म्हणजे त्यांना बळीचा बकरा केला जात आहे. फ्लेक्स लावून कोणी निवडणुका जिंकत नाही. आजवर कामे केली असती, तर फ्लेक्स लावण्याची वेळ आली नसती, अशी टिकाही त्यांनी केली.