वर्धा, दि. १ (पीसीबी) – माणूस जेव्हा संपतो तेव्हा काही धडपड शरीरात तयार होते. आता शरद पवारांची ही शेवटची धडपड आहे, अशी बोचरी टीका ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे ते म्हणाले कि, ज्या पद्धतीने जनतेने पवारांना नाकारले आहे. ते त्यांना आता कळल आहे. विरोधी पक्षाचा नेताही ते आता तयार करू शकणार नाही. संविधानामध्ये पत्रकार हा महत्वाचा बिंदू आहे. पत्रकारांवर भडकून लोकशाही चालत नाही. पवारांकडून असे अपेक्षित नाही, असे बावनकुळे म्हणाले.
दोन दिवसांपूर्वीच राणाजगजितसिंह यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार हे एका पत्रकारावर चांगलेच भडकल्याले पहायला मिळाले. याचा व्हिडीओ देखील व्हायल झाला होता.