आरोप सिद्ध करावेत, अन्यथा भरचौकात विष्टा खावी; सदाभाऊ खोत राजू शेट्टीवर घसरले

0
393

कोल्हापूर, दि. १ (पीसीबी) – आई शपथ घेऊन सांगतो  ‘कडकनाथ’ कोंबड्यांच्या घोटाळ्याप्रकरणी माझा संबंध नाही, असे कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.  माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा, भरचौकात विष्टा खावी, असे आव्हान देखील सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिले.

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास  ५०० कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  कडकनाथ संबंधीची कंपनी सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप होत आहे. यावरुन सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी  यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे.

मी मंत्री झाल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातत्याने माझ्यावर चुकीचे आरोप होत आहे. कडकनाथ संबंधीच्या रयत अॅग्रो कंपनीशी माझा काहीही संबंध नाही. महा रयत अॅग्रो आणि रयत क्रांती संघटना दोन शब्द समान असल्याने विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर झालेले आरोप सिद्ध झाले, तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे सदाभाऊ खोत यांनी  म्हणाले.