मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – शंभर भुंकणारी कुत्री वाघाची शिकार करु शकत नाहीत, हे जग मान्य आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आव्हाड यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
आव्हाड यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ४० वर्षात महाराष्ट्रात जे कोणी आले, पवार साहेबांबद्दल बोलले. पण पवार साहेब आहे तिथे आहेत, मात्र बोलणारे काही स्वतः संपले काही नियतीने संपवले.
दरम्यान, चार खासदारांच्या जीवावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत सौदेबाजी करतात. आता या चारही जागा निवडणुकीत पडल्यावर पवारांना दिल्लीत रहायला घर शोधावे लागेल, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगोला येथे केली होती.