राज्यात दुपारी एक वाजेपर्यंत ३५.७० टक्के मतदान; पुण्यात सर्वात कमी २७.१७ टक्के मतदान

0
615

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज (मंगळवार)  सकाळपासून मतदान सुरु आहे. राज्यातील १४ मतदार संघांमध्ये मतदान सुरु आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात ३५.७० टक्के मतदान झाले आहे. कोल्हापुरात सर्वाधिक ४२.०४ टक्के मतदान झाले. तर पुण्यात सर्वात कमी २७.१७ टक्के मतदान झाले आहे.

दुपारी १ ते ४ या वेळेत  पुणेकर विश्रांती घेणे पसंत करतात. त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्याने पुणेकरांनी दुपारी मतदानासाठी बाहेर पडणे टाळले असावे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतदेखील मतदानाची पुण्यातील टक्केवारी घसल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे –

जळगाव – ३३.१२
रावेर – ३५.१५
जालना – ३७.९१
औरंगाबाद – ३५.४२
रायगड – ३८.७४
पुणे – २७.१७
बारामती – ३५.५८
अहमदनगर – ३४.७३
माढा – ३३.४१
सांगली – ३४.५६
सातारा – ३४.८४
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ३९.९३
कोल्हापूर – ४२.०४
हातकणंगले- ३९.६८