येणाऱ्या दोन दिवसात अंतिम निर्णय होईल – संजय राऊत

0
327

मुंबई,दि.२० (पीसीबी)-  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या चर्चांचे गुऱ्हाळ अजुनही सुरूच आहे.सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दरम्यान संजय राऊत यांनी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यात  १ डिसेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल. बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली, ही बैठक सकारात्मक दिशेने झाल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.

याविषयी बोलताना राऊत म्हणाले की, सरकार स्थापनेसंदर्भात त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काही निर्णय घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. बैठकीनंतर आघाडीच्या काही नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा करण्यात आली आहे. लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल अशी माहितीही राऊतांनी दिली.