नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या हे मुद्दे देशातील वास्तव आहेत. तसेच भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट माझ्यांशी चर्चा करुन दाखवावी, असे थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे.
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा आज (मंगळवार) प्रकाशित करण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले की, मोदींची आरोग्य योजना म्हणजे जनतेकडून पैसा घेऊन उद्योगपतींना देण्यासारखे आहे. जनतेच्या खात्यात सरकार किती रक्कम टाकू शकतो? य़ाची मी माहिती घेतली. मोदींनी दोन कोटी रोजगाराचे आणि १५ लाख खात्यात टाकण्याचे खोटे आश्वासन दिले होते, याची आठवण राहुल यांनी करून दिली .