हृदयद्रावक: पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने पतीने दोन चिमुकल्यामुलींसह घेतला गळफास

0
860

चंद्रपूर, दि. २ (पीसीबी) – पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने पतीने आपल्या २ चिमुकल्या मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील कन्नमवार वार्डात घडली.

ऋषिकांत कडूपाले असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर, नारायणी (वय ५ वर्षे) आणि कार्तिकी (वय २ वर्ष) अशी दुर्दैवी मुलींची नावे आहेत. ऋषिकांतच्या परिवाराने त्याच्या पत्नीवर आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटेमाटे तंत्रशिक्षणमध्ये शिक्षक म्हणून ऋषिकांत नोकरीवर होता. पत्नीही त्याच वार्डात काम करत होती. तिचे वार्डातील वाहनचालकासोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. पळून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी ऋषिकांतने खूप प्रयत्न केले. परंतु, पत्नी ऋषिकांतचे ऐकायला तयार नव्हती. खचलेल्या ऋषिकांतने यामुळे आपल्या २ चिमुकल्या मुलींना गळफास दिला. आणि त्यांचे फोटो काढून पत्नीच्या व्हॉटसअॅप नंबरवर टाकले. पत्नीने फोटो बघताच दिराशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. घरी पोहचताच वेगवेगळ्या खोलीत तिघांचे मृतदेह फास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. चंद्रपुर पोलीस तपास करत आहेत.