यमुनानगर, साईनाथनगर येथील पाणीपुरवठा सुरळीत करू – महापौर    

0
594

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – गणेशोत्सवात निगडी  परिसरातील यमुनानगर, साईनाथनगर या भागात  पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन महापौर राहुल जाधव यांनी  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा – युवती आघाडीच्या  कार्यकर्त्यांना दिले.

युवा मोर्चा सोशल मीडिया आघाडीचे शहर उपाध्यक्ष आदित्य कुलकर्णी, युवती आघाडीच्या शहर चिटणीस मुक्ता गोसावी, युवती आघाडीच्या निगडी चिखली मंडळ अध्यक्षा अंजली पांडे, युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे निगडी चिखली मंडळ अध्यक्ष प्रथमेश आंबेरकर यांनी महापौरांना पाण्याबाबत निवेदन दिले.

त्यावर महापौर जाधव यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून  गणेशोत्सवादरम्यान  पाणी कपात रद्द करूम पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. तसेच शहरातील इतर भागात देखील पाणी पुरवठा सुरळीत आणि मुबलक प्रमाणात करण्यात येईल, असे आश्वासन दिले.