मोदीजी, तुमच्या उद्धट सरकारमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त – राहुल गांधी  

0
688

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – गेल्या पाच वर्षात तुमच्या अकार्यक्षम आणि उद्धट सरकारने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आता या शेतकऱ्यांना दिवसाला १७ रुपये देणे हा त्यांचा अपमानच आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर केली आहे.  

आज (शुक्रवारी) हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा सरकारने केली. यावर  राहुल गांधी यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, मोदीजी, गेल्या पाच वर्षात तुमच्या अकार्यक्षम आणि उद्धट सरकारने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आता या शेतकऱ्यांना दिवसाला १७ रुपये देणे हा त्यांचा अपमानच आहे.

दुष्काळ आणि नापिकीचा सामना करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी शेतकऱ्यांचा याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी वर्षाला ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.