अहमदनगर, दि. ३० (पीसीबी) – भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भरपूर आश्वासने दिली होती, ती त्यांच्यातरी लक्षात आहेत का?, असा सवाल करून पंतप्रधान मोदी आणि भाजप यांनी खूप आश्वासने दिली होती, मात्र ती त्यांनी पाळली नाहीत, त्यामुळे त्यांचे नाव ‘आश्वासनबाज पंतप्रधान’असे ठेवावे लागेल, अशी उपहासात्मक टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज (बुधवारी) येथे केली.