जयपूर, दि. २६ (पीसीबी) – सौगंद है मुझे इस मिट्टी की, मै देश नही मिटने दुंगा… मै देश नही रुकने दुंगा… मै देश नही झुकने दुंगा… अशा काव्यात्मक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना देश सुरक्षित हातात असल्याचा विश्वास दिला.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर मोदी राजस्थानमधील चुरू येथील एका सभेत आज (मंगळवार) बोलत होते. यावेळी त्यांनी २०१४ मध्ये उच्चारलेल्या कवितेच्या ओळी पुन्हा एकदा म्हणून दाखवल्या.
मोदी म्हणाले, मी देशवासियांना विश्वास देतो की, देश सुरक्षित हातांमध्ये आहे. पक्षापेक्षा आम्ही देशाला प्राधान्य देतो. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांना माझे शतशः प्रणाम.
दरम्यान, भारतीय वायूसेनेने पाकिस्तानात घुसून आज (मंगळवार) पहाटे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई पंतप्रधान मोदी यांच्या देखरेखी खाली करण्यात आली. मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.