मुलं पळविणाऱ्या टोळीच्या संशयातून काँग्रेस नेत्यांना मारहाण

0
543

भोपाळ, दि. २८ (पीसीबी) – मुल पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी तिघांना बेदम मारहाण केली. यामध्ये काँग्रेसच्या दोन नेत्यांचा आणि एका सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश आहे. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बैतूल जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून लहान मुलांना चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्याची अफवा पसरली आहे. त्याच दरम्यान काँग्रेसचे धर्मेंद्र शुक्ला, रामू सिंह लांजीवार आणि ललित बरास्कर हे गुरुवारी रात्री आपल्या कारने घरी परतत होते. तिघे मुलांना पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. गावकऱ्यांनी गाडी अडवली आणि कारमधून बाहेर काढून त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये तीन ही जण जखमी झाले असून कारचेही नुकसान झाले आहे. शाहपूर पोलिसांना घटेनची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र हल्लेखोर फरार झाले.