भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात – जयंत पाटील  

0
419

मुंबई, दि. २८ (पीसीबी) –  भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते फक्त योग्य वेळ आणि संधीची वाटत पाहत आहेत, असे सांगून काय चालू आहे या भाजपामध्ये, कुठे नेऊन ठेवलाय हा भाजप, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा  शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही. त्याचे खापर भाजपवर फोडले जात आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. या टीकेला  पाटील यांनी चोख उत्तर दिले आहे.

पाटील म्हणाले की, भाजपकडून लोकांची दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या अनेकांची नावे पसरविली जात आहेत. लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम भाजपने केले आहे. दुसरा पक्ष फोडून आपला पक्ष वाढविणे ही संस्कृती नव्याने भाजपाने आणली आहे. तिला जनता स्वीकारणार  नाही. योग्य वेळी धडा शिकवेल. भाजपकडून वावड्या उठवण्याचे काम सुरू आहे. तसेच राजेश टोपे राष्ट्रवादीतच राहणार आहेत. त्यांच्याबाबत चुकीच्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या, असा खुलासाही त्यांनी केला.