मुख्यमंत्री या संकटात चांगले काम करतायत याचे दु:ख अनेकांना होत आहे – खा.संजय राऊत

0
282

 

मुंबई, दि.१७ (पीसीबी) – देशात कोरोनामुळे लॉक डाऊन असूनही दोन दिवसापूर्वी वांद्रे येथे स्थलांतरित कामगार यांचा मोठा समुदाय जमा झाला होता. यावरून विरोधी पक्ष भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केली होती तसेच सोशल मिडियावर #UddhavResign हेही ट्रेंड करण्यात आले होत. आत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर उत्तर दिले आहे. त्यांनी एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या बाईटमध्ये आपले म्हणण मांडल आहे.

विरोधकांचे बाप, आजी आजोबा आणि अश्या १०० पिढ्या जरी मैदानात उतरल्या तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची संकल्पना वास्तवात येणार नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे सरकार मजबूत आहे. नेतृत्व खंबीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संकटात चांगले काम करतायत याचे अनेकांना दु:ख होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा फायदा घेऊन राज्यात संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांमध्ये उद्रेक घडवून हे राज्य अस्थिर व खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप राऊत यांनी विरोधकांवर केला.