भिवंडीमध्ये तीन मजली इमारत झाली जमीनदोस्त; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

0
175

मुंबई, दि.२१(पीसीबी) : मुंबईमध्ये एक भयानक घडली आहे. काही लोकांची आजची पहाट हि खूप दुर्दैवी आणि भीतीदायक ठरली आहे. मुंबईतील भिवंडी शहरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. आज पहाटे हि दुर्घटना घडली असून अनेकजण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची श्यक्यता वर्तवली जात आहे. या दुर्दैवी घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 20-25 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या NDRF आणि अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लिकांना वाचवण्याचं काम सुरु झालं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 8 जणांचा या दुर्घटनेत बाली गेला असून अनेकजण जखमी झाले आहेत. NDRF आणि अग्निशमन दलाकडून आतापर्यंत जवळपास 14-15 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेतील जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या इमारतीत जवळपास 25 कुटुंब रहात होते.