भारताचा १५० वा कसोटी विजय; तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १३७ धावांनी पराभव   

0
487

मेलबर्न, दि. ३० (पीसीबी) – तिसऱ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा १३७ धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.  भारताचा हा कसोटी कारकिर्दीतील १५०वा विजय ठरला आहे. पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे उपहाराच्या विश्रांतीनंतर सुरु झाला. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ८ बाद २५८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारताने आज २ गडी बाद करत विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताकडून जाडेजा, बुमराहने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.  सामन्यात ९ बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीरचा किताब देण्यात आला.