भाजपच्या एका नेत्याने सांगितलय, ‘तुम्ही कितीही एकत्र या आमच्याकडे ईव्हीएम आहे’

0
517

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – महाराष्ट्र भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने बाळा नांदगावकरांना सांगितले, की भाजप सोडून महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष जरी एकत्र आले तरी आम्हीच जिंकणार कारण ईव्हीएम आमच्या ताब्यात आहेत, असे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी जाहिर सभेत सांगितले आहे. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी ईव्हीएम संदर्भात सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मी मध्यंतरी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधींची भेट घेतली, ममता बॅनर्जींची भेट घेतली, त्यात ईव्हीएम भाजप कशा पद्धतीने वापरत आहे हे ह्या दोन्ही नेत्यांना सांगितले. त्यांनी देखील हा धोका मान्य केला. त्यांनी सांगितले की आम्ही ह्या मुद्द्यावर तुमच्या सोबत आहोत, असेही राज ठाकरे म्हणाले.