पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीच. ते या थराला जातील असे वाटले नव्हते

0
377

कोल्हापूर, दि.२३ (पीसीबी) –  भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारसह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीच. ते या थराला जातील असे वाटले नव्हते, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आज तात्काळ मदतीची गरज आहे. उधारीच्या मदतीची गरज नाही. शेतकऱ्याला थेट कर्जमाफी दिली पाहिजे. असे ते म्हणाले