मोदी-शाहांनी लावलेली ताकद पुन्हा फुकट गेली – संजय राऊत

0
361

मुंबई,दि.२३(पीसीबी) – महाराष्ट्रानंतर आता झारखंड राज्यात देखील भाजपला सत्ता गमवावी लागताना दिसत आहे . पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी झारखंडमध्ये मोठी ताकद लावली होती, मात्र झारखंडच्या जनतेने भाजपला नाकारलं. मोदी-शाहांनी लावलेली ताकद पुन्हा फुकट गेली, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही भाजपला मोठा फटका बसल्याचं दिसत आहे. कारण झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आहे. तर काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसेच झारखंडमध्येही मोदी-शाहांनी लावलेली ताकद फुकट गेली, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीनं बहुमताचा आकडा सहज गाठल्याचं दिसत आहे .दरम्यान, महाराष्ट्रात भाजपने नुकतीच आपली सत्ता गमावली होती. आता झारखंडमध्येही सत्ता जाणार असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.