पाकिस्तान योग्यवेळी स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी भारताला प्रत्युत्तर देईल – इम्रान खान  

0
981

इस्लामाबाद, दि. २६ (पीसीबी) – भारताने अवाजवी आक्रमकता दाखवली आहे.  पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देईल, अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठकीनंतर इम्रान खान  यांनी भारताला इशारा दिला आहे.  

पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने हल्ला करून दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त केले. या हल्ल्यात ३५० दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खानने  राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली.

या बैठकीत संसदेचे संयुक्त अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती इम्रान खान यांनी दिली. यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री आणि पाकिस्तानमधील सुरक्षा दल व सैन्याचे प्रमुख आदीसह वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.