“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरचे विदुषकी खेळ थांबवावेत”

0
337

नवी दिल्ली,दि.४(पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरचे विदुषकी खेळ थांबवावेत, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

कोरोना व्हायरसने सर्व जगभरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. आपल्या देशातही केोरोनाबाधित काही रूग्न सापडल्याने खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटबाबत गैरसमज पसरवून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा. सध्या कोरोना व्हायरस देशासाठी एक आव्हान बनलं आहे. सरकारने कोरोनाचा सामना कसा करता येईल? याकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्ला राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

भारत आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जात असताना, तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा, असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.