“निर्मलाअक्का! जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे”

0
303

मुंबई, दि.१८(पीसीबी) – निर्मलाअक्का! जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे, अशा आशयाचे ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समाचार घेतला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रस्त्याने चालत जाणाऱ्या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावर निर्मला सीतारमन यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. त्या टीकेचा आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे, त्यांच्या बरोबर चालणे… राहुल गांधींची ड्रामाबाजी आहे असे निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे, जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे माणुसकी इथे व्यक्त होतेच, अशा शब्दात आव्हाडांनी सीतारामन यांचा समाचार घेतला.